सोमवार, १६ एप्रिल, २०१८

एक संध्याकाळ मंतरलेली...........!

एक संध्याकाळ मंतरलेली...........!

     मराठी "गझल" साम्राज्याचे अनभुशिक्त सम्राट आदरणीय गझलकार  सुरेश भट यांच्या जयंतीनिमीत्त कल्याण पु.ल. कट्टा येथे  कल्याण काव्यमंच व  चारमित्र  यांच्या संयुक्त विद्यमाने "गझल सरीं" हा मराठी गझल मुशायराचे आयोजन केले होते.

     एेन रणरणत्या उन्हाळ्याच्या दिवसातली कालची संध्याकाळ रम्य अगदी मंतरलेली होती.  एक डेरेदार पारंब्यांनी मढलेला हिरव्यागार वृक्षाचा पार म्हणजे व्यासपीठ आणि त्याच वृक्षाच्या विशाल  खांद्यावर कल्याण काव्यमंच व  चारमित्र  या साहित्य चळवळीचे दिमाखदार बैनर बस्स !
      हया नैसर्गीक नेपथ्याच्या पार्श्वभुमीवर आजच्या गझलसरींची बरसात रंगतदार होणारच  हे गझलसरींमध्ये चींब भिजण्याच्या लालसेने आलेल्या रसिकजनांच्या उदंड प्रतिसादावरून दिसत होतेच....!
या गझलमुशाय-यात  महाराष्ट्रातील नवोन्मुख युवा तसेच ज्येष्ठ गझलकार असा सुंदर समन्वय साधून "गझलसरींचा " वर्षाव हा नुसता मनाला चींब करणारा नाही तर अंतरमनातील सृजनतेला साद घालणारा होणार हे निश्चित हेते.!
        थोडयाचवेळात हे स्थिर शांत चित्र सजीव होत गेलं ते कल्याण काव्यमंच चे हरहुन्नरी उत्साहr आणि कविता म्हटले की आनंद सागराचा तळ ढवळून काढणारे श्री. सुधीर चित्ते सरांनी आपल्या जादुई शब्दांतून प्रस्तावना करायला सुरूवात केली तेव्हा!  या खास या कार्यक्रमासाठी आलेल्या श्री. संदिप गुप्ते  ज्यांनी 76 वा गझल मधील  "दिवाण"  लिहीला त्यांचे खास स्वागत करण्यात आले.  श्री. संतोष हुदलीकर हे खास सपत्निक नाशिकहून या कार्यक्रमासाठी आले होते त्यांचेही स्वागत करण्यात आले!  उत्साही प्रस्तावने नंतर प्रत्यक्ष "गझलसरी"  मुशायराची प्रमुख सुत्र  कल्याण काव्यमंचचे ज्येष्ठ गझलकार श्री. प्रशांत वैद्य यांच्याकडे सुपूर्द केेली....!
     श्री. प्रशांत वैद्य म्हणजे "गझल" मधील दादा माणूस !

शेवटी शेवटी जेव्हा मला मी उमगलो होतो
आतल्या आत मी तेव्हा खुपदा बरसलो होतो !

अशा या मनस्वी आणि संवेदनशील गझलकाराने अतिशय प्रसन्नतेने गझल मैफीलीची सुरूवात करून देतानाच ......

नेल्या जरी उन्हाने माझ्या गझलसरी
आल्या पुन्हा नव्याने माझ्या गझलसरी!

अशा सुंदर शेराने मुशाय-यात सामील सर्व गझलकारांचे सुंदर स्वागत केले.....!

प्रत्येक शायर ची ओळख म्हणजे त्याचा एक एक शेर असतो याचा प्रत्यय मग सामील प्रत्येक गझलकाराच्या गझलीयत मध्ये दिसत गेला....!!

विजय उतेकर मुंबई....

होतात वार सारे पाठीवरीच माझ्या
तू वार मोजताना मागून मोजणी कर  !

किंवा
सुर्य कलतो जीवघेणा काळ येतो
सावल्या मी चोरल्याचा आळ येतो..!

स्पर्श झाला जुना झाल्या जाणिवा
शहारा हा तरी तात्काळ येतो...!

 तसेच

पाहुनी लगबग समाधीवर फुलांची
चार स्वप्ने आत्महत्येवर निघाली!

असे एकापेक्षा एक जीवघेणे शेर आणि मैफील रंगत गेली... क्षणात मुग्ध झाली......

जयश्री कुलकर्णी नाशिकच्या तरूण युवा शायरा... !

अतिशय सयंत तरिही टोकदार शायरी....
 वाटे वाटे नको नको जे वाट्यास येत आहे
करतोस तुच दैवा गोलमाल हा बहुदा ...!

किंवा -

ईतके कुठून आले रस्त्यात खाचखळगे
तत्वानुसार केली वाटचाल बहुदा ...!

क्या बात  क्या बात रसिंकांचा उदंड प्रतिसाद.... आणि मैफल रंगत होती, सोबत प्रशांत वैद्यांचे सुत्रसंचालन हास्य आणि मिश्किली बहार आणत होते....!  दर्दींची गर्दी वाढत होती....
मध्येच प्रेमळ अपर्णाताईची , चित्ते सरांची रसिक प्रेक्षकांना पाणी चहा देण्याची लगबग आणि तत्परता पाहून कार्यक्रमाच्या नियोजनाला दाद मिळत होती.!

आणि मग अजित मालंडकर यांच्या तरंन्नुम मध्ये सादर केलेल्या गझल म्हणजे मुशायराची चढती कमान होती....




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा